हो आम्ही गरीबच आहोत....
आम्हा लोकांच्या आयुष्यात संवाद हरवला होता, मार्कभाऊ नि FB च्या स्वरूपात आम्हाला एक जागा दिली की बाबा इथे थोडा वेळ घालवा, आपले मित्र जे जगभरात गेले आहेत त्यांच्याशी संपर्कात रहा. आम्ही संपर्क वाढवला, हळू हळू आमचे Virtual Friends ची संख्या आमच्या खऱ्या खुऱ्या मित्रांपेक्षा जास्त झाली. माझे fb वॉर किती जास्त मित्र आहेत हे लोक आता एकमेकाला सांगू लागले. आता जे 200 300 लोकांचं जाळ होत आमचं ओळखीचं त्यात भर पडत गेली आणि ते एव्हाना 500 cross करून exponentiall y वाढत गेलं. अणुबॉम्ब फुटल्यावर जशी चैन reaction वाढत जाते अगदी तसच. आता आम्ही एक मस्त गोड गैरसमज करून घेतला की माझे 1000 मित्र आहेत ( पण ते ऑनलाइन हे विसरलो ) मग लढाई चालू झाली आपलं अस्तित्व इतरांना जाणवून देण्याची, आम्ही हळू हळू फोटो share करू लागलो, likes ची भूक वाढत गेली, मध्यंतरी तर मी काही अकाउंट्स असे पाहिलेत की त्यांच्यात स्पर्धा रंगते, कोणाला जास्त likes मिळणार ह्याची. तर likes आणि कंमेंट्स ची भूक तीही वाढत होती. मग आता जास्त likes पाहिजेत म्हणून वेगळं काहीतरी केलं पाहिजे, त्यात एक वेड आलं सेल्फी च, त्या नादात आता लोक नको त...